गेली सुमारे २५ वर्ष प्रलंबित असलेला प्राधिकरणातील शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल स्थानिक गावकऱ्यांच्या वतीने आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा भव्य सत्कार आकुर्डी येथे आज करण्यात आला.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या विशेष बैठकीत हा प्रश्न उपलब्ध जागा व एफएसआय देऊन मार्गी लावण्याचे आदेश दिले.
हा प्रश्न सोडविल्या बद्दल स्थानिक मंडळींनी आनंद व्यक्त केला. विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर आज पिंपरी चिंचवड मध्ये परतल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन आमदारांचा विशेष सत्कार केला.
यावेळी कैलास कुटे, उत्तम कुटे, गोपाळ कुटे, शंकरराव पांढरकर, बाजीराव काळभोर, निलेश पांढारकर, सुभाष कुटे, गणेश काळभोर, संतोष तरटे, सदाशिव डुंबरे, रामभाऊ पांढारकर, पंढरी थरकुडे, बाळासाहेब भोंडवे, पांडुरंग वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, गिरीश कुटे आदी उपस्थित होते.