!!! पिंपरी चिंचवड शहरातील तमाम धनगर समाज बांधवांच्या पाठिंब्या बाबतचे जाहीर निवेदन !!!
पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाजाच्या काही मोजक्या तुरळक समाज बांधवांनी धनगर समाजाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा जाहीर केला आणि सादर बातमी काही वृत्तपत्रात तसेच काही ऑनलाइन न्युज चॅनेलला प्रसिध्द केली. हा पाठिंबा ज्या ठराविक कार्यकर्त्यांनी दिला त्या कार्यकर्त्यांचा तो वयक्तिक पाठिंबा आहे. हे तुरळक कार्यकर्ते म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातील संपुर्ण धनगर समाज नव्हे. प्रत्यक्षात शहरातील धनगर समाजाचे बहुतांश मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याच्या मानसिकतेत अजिबात नाहीत. ज्या शरद पवारांनी जाणीव पुर्वक धनगर समाजाचे आरक्षण 50 वर्षे सत्ता असुन देखील स्वतःच्या राजकारणासाठी रोखुन ठेवले, ज्या शरद पवारांनी गोपीचंद पडळकर सारख्या धनगर समाजाच्या निवडुन येण्याची क्षमता असणाऱ्या आणि समाजासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या प्रामाणिक, लढवय्या कार्यकर्त्याचे तिकीट महाआघाडी मधुन मिळत असताना सुध्दा कापले. आगामी विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना अडचणीत आणुन समाजाची राजकीय मुस्कटदाबी करण्यासाठी व्यूहरचना करणारे असे शरद पवार आणि त्यांच्या महाआघाडीला पाठिंबा देण्यासाठी कोणताही धनगर समाज बांधव तयार नाही. शिवसेना खासदार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांची समाजाप्रती असणारी धडपड, त्यांनी समाजाच्या आरक्षणासाठी बाळासाहेब वाघमोडे मामा यांच्या माध्यमातुन केलेला पाठपुरावा, श्रीरंग बारणे यांचा असणारा मनमिळाऊ स्वभाव, आम्हा सर्व समाज बांधवांना अगदी हाकेच्या अंतरावर असणारा खासदार या सगळ्या त्यांच्या असणाऱ्या जमेच्या बाजु आम्हा सर्व धनगर समाज बांधवांच्या मनात घर करणाऱ्या आहेत. म्हणुन आम्ही शहरातील तमाम धनगर समाज बांधव मिळुन मावळ लोकशाभेसाठी शिवसेना, भाजपा, आर पी आय, रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना त्याच बरोबर शिरुर मतदार संघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही उमेदवारांना पिंपरी चिंचवड शहरातील तमाम धनगर बांधवांच्या वतीने पाठिंबा जाहीर करीत आहोत. आम्ही सर्व पिंपरी चिंचवड शहरातील धनगर समाज बांधव ( राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे तुरळक वगळता ) शिवसेना भाजपा आर पी आय रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच मतदान करणार आहोत. धन्यवाद, जय हिंद ! जय मल्हार !
राजू दुर्गे, अशोक खरात, विना सोनवलकर, महादेव कवीतके, मिना ढोले, बाळासाहेब वाघमोडे, भरत महानवर, भाऊसाहेब हरणावळ, विश्वास मोटे, बजरंग गडदे, महावीर काळे, बंडू मारकड, सुर्यकांत गोफने, विजय वाघमोडे, जितेंद्र मदने, राजेंद्र घोडके, अजित चौगुले, आशा काळे, मंगल बुधनेर, विनय खामगळ, पोपट हजारे, संजय नायकवडी, गणेश खरात, नामदेव सोनवलकर, नागेश तितर, माणिकराव बारगळ, शिवाजी बिटके, गजानन वाघमोडे, सदाशिव पडळकर, कैलास कोपनर, गिरीष चिकटे,कुंडलिक हुलवान, दत्ता शेंडगे, बबनराव मदने, तानाजी पाडोळे, शिवाजी काळे, नितीन कोपनर, रवी लिटे, आनंदराव तांबवे, सुनिल नवले, दत्तात्रय काळे, दत्तानंद सोनवलकर, अनिल चौगुले, सतीश मदने, प्रवीण शिंदे, शिवाजी आवारे, प्रफुल कोळेकर, युवराज माने, बंडू लोखंडे, आर आर बारगळ, बाबासाहेब पाटील, अजय सुळ, संजय हाटकर, राहुल मदने, आबा सोन्नवर, आनंद धनगर, सुरेखा जानकर, गोरख खामगळ, नंदा करे, डॉ अण्णा लबडे, किशोर शिंदे, शारदाताई वाघमोडे, सोनताई गडदे, प्रकाश मोटे, चेतन तळपे, विलास महारनवर, बाळु शेंडगे, दादासाहेब मासाळ, राजू धायगुडे, कल्याण बर्वे, जयराम शिंदे, अजय सुळ, उमेश थोरात, पांडुरंग माने, बबनशेठ खरात, भरतशेठ कोकरे, हनुमंत मोटे, आदी सर्व प्रमुख कार्यकर्ते यात सहभागी आहेत.