समता हाच विचारांचा धागा घेऊन विद्याताईंनी आयुष्यभर समाजासाठी कार्य केले. त्यांच्या स्वभावात आरस्पानी माणुसकी दडलेली होती अशी भावना कवियत्री सविता इंगळे यांनी आज येथे व्यक्त केली.
स्वयंसिद्धा परिवारातर्फे ज्येष्ठ समाजसेविका विद्याताई बाळ यांना श्रद्धांजली वाहणेसाठी चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात आयोजित शोकसभेमध्ये त्या बोलत होत्या. नगरसेविका अश्विनी चिंचवडे, यांच्यासह सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील संजय बारी, एकनाथ पाठक, नंदकुमार मुरडे, ज्ञानेश्वर भंडारे, शोभाताई जोशी, कैलास भरट, सुप्रिया सोळांकुरे स्वाती ठकार, सुरेखा कटारिया, सुहास घुमरे, विजय जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी विद्याताई बाळ यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कार्य आपण कसे पुढे नेऊ याविषयी विचारमंथन केले व श्रद्धांजली अर्पण केली.