शेतकरी व सामान्य घटक विजेबाबत चिंतामुक्त करणे
ग्रामीण व शहरी उद्योगजगता वाढीसाठी प्रोत्साहन
डॉ. आंबेडकरांच्या उर्जा धोरणाचा आदर्श
पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ करणार
मुंबई-
अखिल भारतीय कांग्रेस कमेटी च्याअध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व आमचे नित्य मार्गदर्शक श्री राहुल गांधी यांनी मा. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्याकडे ऊर्जा खाते सोपविले, याबद्दल मी मनापासून आभारी आहे .
उर्जा खाते महाराष्ट्र राज्याला आणि राज्यातील प्रत्येक घटकाला ऊर्जावान बनवेल अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे नवे ऊर्जा मंत्री ना. डाँ.नितीन राऊत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की ७७ वर्षांपूर्वी ब्रिटीश व्हाॅईसराॅय च्या कौन्सिल मध्ये देशाचे उर्जा मंत्री डाँ.बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी उर्जा विभागाची पाया भरणी केली आहे. त्यानंतर माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील आंबेडकरवादी कार्यकर्त्याकडे राज्यातील उर्जा विभागाची जबाबदारी देण्यात आली हा मी माझा सन्मान समजतो . पक्षाने माझ्यावर दाखविलेला हा विश्वास मी सार्थ करणार.
शेतकरी व सामान्य माणसाला किफायतशीर दरात मुबलक वीजपुरवठा उपलब्ध करण्याबरोबरच ग्रामीण व शहरी उद्योजकता वाढीला माझे प्रोत्साहन असेल. सोबतच वीज निर्मितीमध्ये राज्याला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी नवीन वीज निर्मिती प्रकल्प निर्माण करणे व वीज निर्मितीसाठी अन्य स्त्रोतांचाही विचार करण्यावर प्राधान्य राहील. तसेच राज्यातील शेतकरी व सामान्य घटकाला विजेबाबत चिंतामुक्त करण्यावर भर राहील असेही ना. ऱाऊत म्हणाले.