( विजय जगताप)
निष्ठावान व आपल्या वलयाने दिग्गज असलेल्या भाजपाच्या जुन्या जाणत्यांना योग्यसमयी नारळ देण्याच्या कार्यक्रमाला पक्षाने केलेली सुरूवात म्हणजे ‘पुढच्यास ठेस मागचा शहाणा’ अशा उक्तीची ठरली आहे.
अडवानी -वाजपेयींचा तो भाजप आता राहिलेला नाही हेच दाखवून देण्याचा हा अप्रत्यक्ष इशारा सगळ्यांनी ओळखून ‘आता गपगूमान रहायचं ‘असेच सूचित करणारा आहे.
मोदी लाट आल्यानंतरही गुरगुरणं सुरूच ठेवलेल्या भाजपच्या प्रतिकूल काळातील दिग्गजांची जर अशी अवस्था होणार असेल तर नव्यांनी कसे वागायचं व कसं रहायचं हे ओळखून जायचं आहे.
एकेकाळी खुद्द गोपीनाथ मुंडेंच्याही नाकी नऊ आणलेल्या व आपल्या राजकीय आयुष्यात तीनदा पक्षाविरूध्द जाहीर नाराजी प्रकट करणा-या मुंडेंनाही हतबल व्हावे लागले होते हा इतिहास आहे . मात्र तेव्हा ओबीसी,वंजारी -धनगर समाजाची मोठी साथ असल्याने मुंडेंची समजूत काढली जाऊन त्यांना मनासारखी स्पेस मिळायची. परंतू आज त्यांच्या कन्या पंकजा यांना संसदीय राजकारणातून थेट ब्रेक दिला जातो.व त्या घटनेस पाच दिवस होऊन जातात तरी राज्यातून ‘हूं की चू ‘होत नाही याचा अर्थ आता ओळखून जायचा आहे.
भावना, रडारड, आक्रोश, संताप यांना आता नव्या प्रयोगशाळेत थारा नाही हेच संकेत आहेत व राहणार आहेत.
आव्हान देणारा मग तो स्वपक्षातील असो की विरोधी पक्षातील त्याचा योग्य वेळी ‘कार्यक्रम’ करणे हेच आता नवे सूत्र आहे आणि राहणार आहे.
जमीन व्यवहार प्रकरणात अडकल्यानंतर व नंतर हे प्रकरण निवळल्यानंतरही नाथाभाऊंचे पुनर्वसन झाले नाही .पक्षाची चाल ओळखूनही ते कधी पवार तर कधी ठाकरेंना भेटून भाजपला झाश्यात घेण्याचे काम करत.नाथाभाऊंनी हे उद्योग केले आणि तीच त्यांची चूक ठरली.योग्य वेळी अचूक निर्णय घेतला नाही आणि आता पाणी पार नरडयापर्यंत आल्यानंतर हातपाय मारून उपयोग नाही अशी त्यांची गत झाली.
२०१४ ला सेनेबरोबरची युती तोडत आहोत असे सांगण्याची डेअरींग कोणात नव्हती तेव्हा नाथाभाऊंना तोफेच्या तोंडावर पाठविले व घोषणा करायला लावली ,आता तेच नाथाभाऊ सेनेसह सा-यांच्याच कपाळात आपसूक बसले आहेत.अमिताभ, अभिषेक , ऐश्वर्या ठिकठाक असताना त्यांच्या आराध्याला घेऊन पिक्चर काढण्याची घोषणा केल्यानंतर अमिताभच्या जीवाची कशी कालवाकालव होईल तशी गत २०१९ ला नाथाभाऊंच्या मुलीला तिकीट देऊन करण्यात आली.
आता आपल्याला थांबवण्यात येतंय आपण थांबले पाहिजे हे कळूनही नाथाभाऊ धडपड करीत राहिले . मूळात नाथाभाऊंचाही त्यात दोष नाही ,कारण राजकारण ही नशाच भयंकर आहे. बावनकुळे व तावडे यांना आपल्या होडीची क्षमता किती आहे ?याचा अंदाज असल्याने त्यांनी चुप्पी साधली आहे.
आज भाजपा अशा स्थानावर आहे की त्यांना कोणाचीच फिकीर नाही. पंकजा मुंडेंनी उदया शिवसेनेची वाट निवडली तरी ( मधल्या काळात दोनदा त्यांनी उध्दव यांची स्तुती केली होती) महाविकास आघाडीचे शिलेदार धनंजय मुंडे यांची शिफारस लागणारच..? आणि ते पायावर दगड मारून घेतील का ? हा पण प्रश्न आहेच.
अ