कोरोनाविषयीची वाटणारी प्रचंड भिती हाच महत्त्वाचा भाग रूग्णांना आजपर्यंत गंभीर स्थितीत घेऊन जात असल्याचे माझे निरीक्षण असून होमिओपॅथिक उपचार पध्दतीने आपण १२० रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळविले असल्याची माहिती डाॅ विजयसिंह निकम यांनी आज ‘बातमी खासशी ‘बोलताना दिली.
कोरोनाच्या संकटकाळात आयुर्वेद, होमिओपॅथिक व युनानी यांच्या उपचार पध्दतीचा व मार्गदर्शक तत्वांचा समावेश टास्क फोर्सने करण्याचे आवाहन केले होते.या पार्श्वभूमीवर डाॅ निकम बोलत होते.
कोरोना होऊच नये यासाठी तसेच झाल्यानंतर सुध्दा त्यास नियंत्रणात आणता येणारी उपचार पध्दती होमोओपॅथिकमध्ये आहे. या वैदयकीय शास्त्राची माहिती असलेले व विश्वास असलेले निसंकोचपणे या उपचारपध्दतीचा लाभ घेत असून आपण उपचार केलेला एकही रूग्ण गंभीर स्टेजला गेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
आॅक्सिजन व व्हेंटिलेशन पर्यंत एकही रूग्ण आपली उपचार पध्दती केल्यानंतर गेला नसल्याचे त्यांनी म्हटले. पिंपरी कॅम्प येथे होमोओपॅथिक उपचारासाठी वाहिलेल्या सुसज्ज रूग्णालयाची जबाबदारी डाॅ विजयसिंह निकम सांभाळतात.
सध्याचा काळ हा नक्कीच भयभीत करणारा व तणाव वाढवणारा आहे. घाबरल्यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते, हार्मोन्स वाढतात व कोरोनाच्या विषाणुंचा शिरकाव जलद होतो.मात्र कोरोनाविषयी तिळमात्र भिती न बाळगणे व कोरोना झाला तरी मानसिक ताण न घेणे हाच कोरोनातून बरा होणारा सुलभ मार्ग आहे.जास्त थंड वातावरण किंवा प्रचंड उष्ण तापमान यामध्ये न येण्याची काळजी घ्यावी.अतिघाम आल्यास पुसून घेणे उत्तम, पंख्यासमोर स्वत:ला अर्पण करू नये, उपाशी न राहणे, उपवास, तसेच वजन कमी करण्याची आहार पध्दती या गोष्टी टाळाव्यात, अतिश्रम करू नये, तसेच किमान सहा तास तरी झोप प्रत्येकाने घ्यावीच.
आपले एक निरीक्षण नोंदविताना डाॅ निकम म्हणाले की,डाॅक्टर,परिचारिका तसेच पोलीस ही मंडळी सातत्याने लोकांच्या संपर्कात येऊनही व बाहेर असूनही या मंडळींना कोरोना होण्याचे प्रमाण अवघे एक ते दोन टक्के आहे, याचे कारण म्हणजे या मंडळींनी स्वत:ला लोकांसमोर मानसिकरित्या सामोरे जाण्याचा अंगीकृत स्विकार केला आहे व त्यांच्या शरीराने ते स्विकारले आहे.
एकूणच कोरोना गंभीर नाही त्यास सहज कोणीही हरवू शकतो, होमोओपॅथिक उपचाराने त्यास दूर लोटता येते व कुटूंबात तो विषाणू शिरकाव करण्यास अटकावही करता येतो असे त्यांनी सांगितले.
(रुग्णांसाठी डाॅ निकम यांचा मोबाईल नंबर 9970827575 )