संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ अर्थातच चिंचवडचा राजा या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत रत्नागिरी जिल्हयात जाऊन आज धान्य वाटप केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील तीनही जिल्ह्यांतील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे . पूर, भूकंप,यासारख्या संकटात राज्यातील जनतेच्या मदतीला धावण्यामध्ये संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचा लौकिक आहे. मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचे घरे, शाळा, दुकाने आदींचे मोठे नुकसान झाले . या नैसर्गिक संकटामुळे उध्वस्त झालेल्या आपल्या बांधवांच्या मदतीसाठी मंडळाचे कार्यकर्ते महेश मिरजकर, प्रमोद बरडिया, तुषार बरडिया आदी कार्यकर्त्यांनी टेम्पो भरून धान्य व गरजेच्या मुरूड, केळशी, सरदे या गावातील लोकांना धान्य व किराणा वस्तू वाटप केले.याकामी रत्नागिरीचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड यांची मदत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.