आॅनर किलींग घटनेमुळे राज्यभर सर्वत्र संताप व्यक्त होत असलेल्या विराज जगताप हत्या प्रकरणी त्याच्या कुटूंबियांच्या भेटीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उदया( शनिवारी दि.१३) रोजी येथे येत आहेत.
विराज जगताप या बौध्द युवकाच्या प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आता राज्यात उमटणे सुरू झाले आहे. दरम्यान दुपारी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ना.आठवले यांचे आगमन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासनास सुचना देण्यात आल्या आहेत. आज घटना घडून पाच दिवस झाल्यानंतर शहराच्या महापौरांनी विराजच्या कुटूंबियांची भेट घेतली.