कोरोना संकटामुळे हवालदिल झालेल्या पिंपरी चिंचवड शहरातील हातावर पोट असलेल्या नागरिकांची भूक भागविण्यासाठी तीन कार्यकर्ते मात्र गेल्या ३३ दिवसांपासून अहोरात्र राबत अाहेत.
नटराज प्रतिष्ठानचे महेश स्वामी, जोशी केटरर्सचे संदीप जोशी आणि सर्जेमामा भक्त मंडळाचे खंडूशेठ चिंचवडे अशी त्यांची नावे असून बातमी खासच्या टिमला त्यांचे हे निरपेक्ष भावनेने सुरू असलेले काम आज जवळून पाहण्याच्या संधी मिळाली.
लाॅकडाऊन सुरू झाला आणि शहरातील मजूर, बिगारी व रोज कमवून खाणा-या हातांना ब्रेक बसत मोठा फटका बसला. जवळपास १८०० नागरिक असे आढळून आले की त्यांना जगविणे हे आता मुख्य कर्तव्य बनले.दोन वेळचे जेवणही मुश्किल असणा-या या वर्गासाठी महापालिकेने धान्य व किराणा देण्याच्या बाबतीत पुढाकार घेतला खरा मात्र एवढ्या लोकांसाठी ते बनवणार कोण? वाटप करणार कोण? हा मोठा प्रश्न होता. गेली २० वर्षापासून शहरात सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नटराज प्रतिष्ठानच्या महेश स्वामी यांनी मग ही जबाबदारी खांद्यावर घेतली . त्यांना जोशी व चिंचवडे यांची साथ लाभली. शहरातील मोशी, चिंचवड स्टेशन,वाहतूकनगरी,निगडी,मोरे वस्ती,डांगे चौक,तालेरा रूग्णालय येथे अन्नदान करावयाचे हे स्पाॅट निश्चित झाले होते.२८ मार्चला या अन्न निर्मिती पासून वाटपाचे काम सुरू झाले आहे आणि ते कुठल्याही अडथळयाशिवाय सुरूच आहे.
भाजी निवडणे , धुवून घेणे, याचबरोबर दररोज स्वच्छ मोठया भांडयांमधून अंदाजे दोन हजार लोकांसाठी डाळ, भात, भाजी बनविणे ती पॅक करणे, क्रेड मध्ये भरणे , टेम्पोतून ती निरनिराळया भागात ठरवलेल्या वेळेला पोहोचविणे आणि वाटणे . सेम प्रक्रिया संध्याकाळच्या जेवणाची अशीच करणे हे त्यांच्या नित्याचे बनले.
शहराला अन्नासाठी महाग झालेला गरीब , वंचित यांचा आशिर्वाद घेत या तिघींचे काम सुरू आहे.
खात्री पटण्यासाठी अन्नदान वाटप करतानाचे फोटो काढावे लागतात ही वस्तुस्थिती असल्याचे महेश स्वामी यांनी बातमी खासशी बोलताना सांगितले.
याचबरोबर व्यक्तिगत स्वरूपात स्वामी यांनी गरजूंना देण्यासाठी रोज फूड रॅकेट तयार करतात. आणि शोध घेऊन किंवा कुणी कळविल्यानुसार ते पॅकेट पोहोचवितात. साखर , चहा, पीठ, मीठ, तांदूळ, तेल व तूरडाळीचा त्याध्ये समावेश आहे. आजपर्यंत अशी ७०० पॅकेट त्यांनी गरजूं पर्यंत पोहोचवली आहेत