प्रबोधनातून बदल घडतच असतो परंतू ज्यांच्यात बदल घडायचा असतो त्यांच्यातील अत्मियता जागृत असली पाहिजे अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यां अश्विनी मुदळे यांनी आज व्यक्त केली.
पिंपरी येथील संकल्प रोज पुष्पमाला आर्पण समितीच्या वतीने अश्विनी मुदळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याळा पुष्ममाला आर्पण करून दिवसाची सुरूवात केली.
यावेळी साईराज मोरवेकर याचाही वाढदिवस याच ठिकाणी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास रोहिदास समाज उन्नती समितीचे किशोर गवळी, मधुकर बुरुटे, संत रविदास विचार मंचचे सुनील रोकडे, सागर भोसले, संत रविदास विचार समिती निगडीचे संतोष वाघमारे, विष्णू सातपुते, दत्तात्रय शिंदे, दत्ता राजगुरू, अभिमन्यू साबळे, सौ. साबळे, विष्णू कांबळे, आयु. रेश्मा कांबळे, प्रिया कांबळे, राजेंद्र हागवणे, नरसिंग माने, आयु. लक्ष्मी माने, उत्तम मोरे, विनोद कांबळे, संजय उबाळे, रमेश जाधव, विजय कांबळे, कैलास लोखंडे, बोरकर, राजकुमार कांबळे, दादासाहेब माने, विनायक लोकरे, मा. वरिष्ठ पोलिस अधिकारी ताकतोडे, रामदासजी इंगळे, आयु. वैशालीताई उबाळे, आयु. संजीवनी मांजरे, आयु. प्रतिभा गेडाम, आयु. निता आंभोरे, ज्योती किशोर लांडगे, विजय गेडाम अध्यक्ष भारिप घरकुल नवनगर संकुल, महादेव वाघमारे, गणेश क्षीरसागर, प्रमोद गायकवाड, केशव जाधव, राहुल गायकवाड, आयु. सविता गायकवाड, संभाजी गायकवाड, आयु. शारदा उमरकर, आयु. लक्ष्मी माने, काळुराम माने, विनोद चित्ते, मिलिंद जाधव, डोंगरदिवे, प्रा. वाघमारे, दीपक मीरपगार, गिरिष वाघमारे, लक्ष्मण मुदळे व आयु. पद्मिनी मुदळे, सोमेस मुदळे, प्रकाश पवार, विष्णू मांजरे तसेच पिंपरी चिंचवड भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आश्विनी मुदळे म्हणाल्या, समाज प्रबोधनातून मानसाच्या जीवनात परिवर्तन घडतच असते, ज्या प्रमाणे वर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असतात परंतु त्यातील काही मोजकेच विद्यार्थी घडत असतात, त्याचे कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांची आत्मियता जागृत असते त्यामुळेच काहीच विद्यार्थी यशस्वी होतात. त्याचप्रमाणे ज्याची अत्मियता जागृत आहे, तेच परिवर्तन घडवू शकतात. त्यांच्याच जीवनातील बदल हा महत्त्वाचा असतो, त्याचेच अनुकरण जीवनास उपयोग होतो व मानव जगतात जागृततेचा सुखी जीवन जगण्यास लाभदायक होते.
त्यांनी आपल्यातील परिवर्तनाचे उदाहरण देताना त्यांच्या परिवर्तनवादी विवाह सोहळ्याचे उदाहरण दिले. त्यांचा विवाह १४ मे २०१८ रोजी म्हणजे छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जयंती दिवशी संपन्न झाला. त्यामध्ये पारंपारिक कर्मकाडांपासून अलिप्त राहून विवाहाची सुरूवात महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन केले व त्यांनी तथागत गौतम बुद्ध संत रविदासांनी सांगितलेल्या मार्गाचा आवलंब करून त्यांचा विवाह झाला. या सर्व त्यांच्या व त्यांच्या कुटुंबींयाच्या कर्तृत्वातून समाजाला एक परिवर्तनवादी कुटुंब म्हणून संबोधण्यास काही हरकत नाही, असे निष्पन्न होते.