छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा विशिष्ट धर्म वा व्यक्तींच्या विरोधातील असल्याचे निर्माण केली जाते. मात्र त्यांची खरी लढाई स्वराज्यासाठी होती असे प्रतिपादन विचारवंत विजय गायकवाड यांनी आज येथे केले .
मराठा सेवा संघ , पंचशील बुद्ध विहार आणि लहुजी वस्ताद साळवी सेना संत तुकाराम नगर, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंती निमित्त प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते . कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अँड लक्ष्मण रानवडे होते. माजी महापौर योगेश बहल, कार्यक्रमाला सुरुवातीला बहल यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . या वेळी कार्यक्रमाला डॉ . मोहन पवार , सचिन दाभाडे , अँड . श्रीराम डफळ, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष राजू आवळे , प्रकाश बाबर , आर .बी. गायकवाड, पंचशील बुद्धविहाराचे उपाध्यक्ष विशाल कांबळे , दादाभाऊ आल्हाट , अँड . सुनीता रानवडे , सुनीता शिंदे , मोहन जगताप , सुरेश इंगळे , वाल्मिकी माने , सदाशिव राजिवडे, स्मिता म्हसकर , शोभा जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
या वेळी प्रकाश जाधव यांनी , आपल्या भाषणात , शिवाजी महारांच्या काळात स्त्री सन्मान व स्त्रीकर्तृत्वाची दाखल राजदरबारी घेतली जायची असे म्हटले .
तर अँड रानवडे यांनी , थोर पुरुषांच्या जयंत्या विविध समाजातील लोकांनी एकत्रित येऊन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले .यावेळी जिजाऊ संघटनेच्या प्रदेश महासचिव पदी उषा पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या श्रीफळ व शाल घालून सन्मान करण्यात आला तसेच पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या सह सचिव पदी निवड झाल्या बद्दल अँड सुनील रानवडे यांच्या श्रीफळ व शाल घालून सन्मान करण्यात आला . या कार्यक्रमाच्या सुरुवातीस रत्नप्रभा सातपुते व संगीता निकम यांनी जिजाऊ वंदना सादर केली. या वेळी कु. अवनी बिराजदार हिने पोवळा सादर केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद खामकर यांनी केले तर , सुभाष देसाई यांनी आभार मानले.