मी कल्पना अशोक शिलवंत. कोरोनासारख्या आजाराशी मी दिलेला लढा, या जीवनमरणाचा लढाईत मला ज्या खऱ्याखुऱ्या दैवतांचा °साक्षात्कार° झाला त्याबद्दलचा अनुभव आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करतेय.
महिनाभरापूर्वी म्हणजे 25 जून रोजी मला दोन-तीन जुलाब झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला प्रचंड ताप आला. मला वाटले लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मी घराच्या बाहेर पडलेले नाही तर हा साधारण तापच असेल. त्यामुळे मी घरी पॅरासिटॅमॉल च्या गोळ्या घेतल्या ताप गेला थोडे बरे वाटू लागले. त्यानंतर अचानक संध्याकाळी पुन्हा ताप आला पुन्हा गोळी घेतली थोड्या वेळाने घाम जाऊन ताप गेला. त्यानंतर मला थोडी थंडी वाजू लागली. 28 तारखेला डॉ पाडळे, डॉ अमोल होळकुंडे यांच्या सांगण्यावरून छातीचा एक्स-रे केला, तो बघितल्याबरोबर डॉक्टरांची शंका खरी ठरली आणि मी •कोरोना पॉझिटिव• आले.
मनात प्रश्नांचा कल्लोळ माजला मी घराबाहेर गेले नाही, माझे पती देखील घराबाहेर गेले नाहीत.लाॅकडाऊन पासून आम्ही आमच्या रूम मध्ये काॅरंटाइन आहोत. मग हा आजार नेमका आला कुठून? घरी मुलं, सुना, लहान नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांना तर नसेल झाला? माझे पती #अशोक_शिलवंत हे मधुमेह व ब्लड प्रेशर चे रुग्ण आहेत आता सगळ्यात जास्त चिंता वाटत होती ती फक्त त्यांचीच, माझ्यामुळे त्यांना तर नसेल ना हा आजार झाला? अशा सगळ्या प्रश्नांमध्ये डोके गरगरत होते.
डॉक्टरांनी मला ताबडतोब #वायसीएम मध्ये ऍडमिट होण्यास सांगितले. माझ्या मुलाने मला वायसीएम मध्ये दाखल केले. त्या दिवशी मला सकाळपासून धाप लागत होती. श्वास घेताना त्रास होत होता. हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्यांनी मला नॉर्मल ऑक्सिजन लावला. माझा फोन माझ्याजवळ असल्यामुळे बऱ्याच नातेवाईकांचे, मुलांचे फोन येत होते त्यामुळे मी वारंवार तो काढून फोनवर बोलत होते. जेवण येत होते परंतु जेवणाचा माझ्या आवडीनिवडी असल्याने आणि पहिल्यांदाच रुग्णालयात ऍडमिट झाल्याने मला तिथले जेवण फारसे आवडले नाही.
दोन दिवसानंतर मला आणखीनच त्रास व्हायला लागला त्यातच कळले माझे पती देखील पॉझिटिव आहेत, त्यांना चिंचवड येथील •आदित्य बिर्ला हॉस्पिटल• मध्ये ऍडमिट केले आहे. नुकतेच जानेवारीमध्ये त्यांना #पेसमेकर बसवले होते त्यामुळे माझा जीव अजूनच घाबरला. त्यानंतर डॉ विनायक पाटील,डॉ सोनी,डॉलाठी यांनी मला आयसीयूमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.तिथली परिस्थिती अतिशय भयानक होती सतत वाजणारे #व्हेंटिलेटर चा आवाज आणि मनात धडकी भरत होती. डॉक्टर कोण, नर्स कोण, मावशी कोण काहीच कळत नव्हते. आता तर जेवणाचा प्रश्नच नव्हता.आयसीयूच्या आवाजामुळे माझी प्रचंड चिडचिड होत होती. मी सारखे सारखे मास्क काढण्याचा प्रयत्न करत होते. बाथरूमला स्वतः जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे माझी परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीच बिघडत होती. माझ्या अशा वागण्यामुळे डॉक्टर देखील हतबल झाले होते. शेवटी एक आठवड्यानंतर माझा मुलगा पीपीई किट घालून मला भेटण्यास आला त्याच्याकडून कळले की त्याच दिवशी माझ्या पतींना डिस्चार्ज देण्यात आला आहे व त्यांची प्रकृती ठीक आहे. त्याने मला समजून सांगितले की #डॉक्टरजे_सांगतील ते ऐक. त्या दिवशी त्यांनी आणलेले एक सफरचंद खाल्ले पोटाला थोडा आधार वाटला व मनाशी ठाम ठरवले डॉक्टर सांगतील त्या पद्धतीने सर्व ऐकायचे. परंतु वेळ खूप झाली होती. माझी तब्येत आणखीनच खालावली होती.
डॉ. विनायक पाटील डॉ.लाठी यांनी माझ्या मुलांशी चर्चा करून #प्लाजमा_थेरेपी चालू करण्याचा विचार केला आणि संदीप जाधव यांच्या मार्फत •जनकल्याण रक्तपेढी स्वारगेट• येथून मला प्लाजमा उपलब्ध देखील झाला. त्यानंतर मला #रेमेडिसीवीर या औषधांचा देखील कोर्स सुरू केला. त्यानंतर माझ्या मनात मी °सकारात्मक° विचार करू लागले व त्याचे परिणाम दिसू लागले पुढच्या शनिवारी म्हणजे दिनांक ११जुलै रोजी मला घरी सोडण्यात आले. १४दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यामुळे प्रचंड थकवा आला होता. आता मनाशी निश्चय केला होता की लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं आणि या एकाच गोष्टीच्या जोरावर मी आज पूर्णपणे ठणठणीत बरी झाली आहे. आम्हा दोघा पतीपत्नींचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आलेत.
हा लेख लिहिण्याचे कारण की माझ्या घरी माझ्या सुना मला काढा करून देत होत्या पण मी तो घेत नव्हते. मला दूध कधीच आवडत नाही त्यामुळे मी ते देखील टाळत होते. निवडक फळेच निवडकच भाज्या मला आवडत होत्या त्यामुळे बहुतेक माझी रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली असेल. याउलट माझे पती हे या सर्व गोष्टी खातपीत होते. त्यामुळे त्यांना एवढे सगळे आजार असून देखील कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झाला नाही. कोरोना कोणामुळे झाला हे देखील मला कळले परंतु यात सर्वस्वी चूक ही माझीच होती आणि हे सत्य आहे.
कोरोना पासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ती स्वतःची काळजी घेणे वारंवार हात धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरणे,मास्क चा नियमित वापर करणे यातून देखील दुर्दैवाने कोरोना झालाच तर घाबरून जाऊ नये. वास्तविक पाहता टीव्हीवरील बातम्या, समाज माध्यमातील बातम्या पाहून आपण आधीच घाबरलेलो असतो त्यामुळे निम्मे आपण तिथेच खचून जातो. #सकारात्मकदृष्टिकोन, नियमित श्वसनाचे व्यायाम आणि डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते सांगतील त्या सूचनांचे पालन करणे यातून आपण बाहेर पडू शकतो. माझी मुलगी ही #नगरसेविका असून देखील आम्ही कोणत्याही प्रकारच्या #स्पेशलट्रीटमेंट ची अपेक्षा न ठेवता पूर्णपणे डॉक्टरांवर सोपवले होते. आता रुग्णांची संख्या देखील खूप वाढली आहे. तसेच रुग्णालयातील कर्मचारी मर्यादित आहेत त्यामुळे त्यांच्यावर नाराज न होता चिडचिड न करता उपचार करून घ्यावेत कारण ते देखील माणूसच आहेत त्यांनादेखील परिवार आहेत त्यांनी जर हात वर केले तर परिस्थिती खूपच #भयानक होईल.
या पोस्टच्या निमित्ताने मी माझ्या वर उपचार करणारे नियमित चौकशी करणारे कौन्सलिंग करणारे डॉक्टर म्हणजे ‘#देवच’ #डॉविनायकपाटील, #डॉलाठी, #डॉपाडाळे, #डॉसोनी, #डॉअभयदादेवार, #डॉअनंतगव्हाणे, #डॉसंदीपपाटील, #डॉअमोलहोळकुंडे, #डॉफिरोजसय्यद (#सोलापूर) अन्य सर्व डॉक्टर तसेच सर्व #नर्सिंगस्टाफ,#बीव्हीजीस्टाफ,#मावशी,#मामा तसेच वायसीएम रुग्णालयातील #डॉवाबळे, #डॉपवनसाळवे तसेच सर्व #कर्मचारीअधिकारी, #जनकल्याणरक्तपेढी #संदीपजाधव, #भिमरावमाने, #अभयशेठदर्डा यांचे मी माझ्या पुनर्जन्माबद्दल मनापासून आभार व्यक्त करते आणि येत्या 10 ऑगस्ट रोजी ◆प्लाझ्मा◆ दान करून माझे कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प करते. सर्व देवदूतांचे पुन्हा ★मनःपूर्वक_आभार..!★