कोरोनासोबतच आता आपल्याला जगावं लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आखाड पार्ट्या न करता आनंदाला मुरड घालावी असे कळकळीचे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज केले.
फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी आज नागरिकांशी संवाद साधला.आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने आपल्या जीवनशैलीला हा दिवस विशिष्ट पध्दतीने साजरा करण्याची सवय आहे मात्र सद्यस्थितीत पार्ट्याचे हे प्रकार घातक ठरू शकतात असे त्यांनी आज म्हटले.परिचित मंडळी एकत्र येणे, मग जोश येणे, मास्क उतरविणे असे प्रकार होतात आणि नकळत फैलाव होऊ शकतो या बाबींकडे आयुक्तांनी आज विशेष लक्ष दिले.
शहरातील नागरिक अजूनही कोरोनाकाळातील नियम व शिस्त पाळण्यामध्ये गंभीर नसून १४ ते१८ जुलै या कडक लाॅकडाऊन मध्ये पोलीस व पालिका प्रशासनाने लोकांकडून १ कोटी पेक्षा जास्त दंड वसूल केला असल्याचे त्यांनी म्हटले. दंड आकारणे हे भूषणावह नाही मात्र नागरिक बेपर्वा होत असून गांभीर्य अजूनही आले नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
शहरातील कोरोना रूग्ण संख्या १० हजारांच्या पुढे गेली असली तरी ८ हजार रूग्ण असे होते का त्यांना कुठलीही लक्षणे नव्हती मात्र ते कॅरियर( वाहक ) होते असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.