आज पासून शासनाने खूप काही गोष्टी सुरु केली आहेत आता या सुरु केलेल्या गोष्टी पुन्हा बंद होणार नाहीत तरी कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका, काळजी घ्या असे आवाहन शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विभाग संघटिका नंदा फड यांनी केली आहे.
जर काही कारणास्तव बाहेर गेलाच तर सर्व काम पूर्ण करूनच घरी या… घरी आल्या आल्या कुठेही स्पर्श न करता थेट आंघॊळ व आपले कपडे डेटॉल किंव्हा फेस असलेल्या पाण्यात घाला..,आता खाजगी कार्यालये तसेच उद्योग सुरु केले आहेत आपण जर कामावर जात असाल तर कामाच्या ठिकाणी सुरक्षित शारीरिक अंतराचे नियम पाळून काम करा…,
काम सुरु झाल्याने गावी गेलेले अनेक जण पुन्हा आपल्या घरी परतत आहेत.. अश्यांची पूर्ण माहिती घ्या शासकीय नियम पाळून पास घेऊन सदर व्यक्ती आले आहेत का?? नियमा नुसार त्यांना स्वतःने स्वतःला तसेच कुटुंबातील सर्वानां अलगीकरण केले पाहिजे…. तसे करत नसेल तर त्यांना ते करण्यास भाग पाडा.. त्यानंतर देखील ऐकत नसेल तर प्रशासनाला त्याबद्दल माहिती द्या..,हे करत असताना आपल्याला स्वतः सोबत समाजाची देखील काळजी घ्यावयाची आहे ह्या अनुशंघाने कोणाचेही मन न दुखावता करण्यास भाग पाडलं पाहिजे.. जर कोणी गावावरून आला आणि सरळ कामाच्याठिकाणी अथवा समाजात मिसळला तर ते धोकादायक होऊ शकते कारण प्रवास करताना घेतलेले आरोग्य तपासणी अहवाल हा फक्त प्रवास करण्यासाठी असतो कोरोनाची तपासणी नसते..,घरातील वस्तू आणण्यासाठी जे बाहेर गेलेत शक्यतो त्यांनींच घरी परत येताना घेऊन यावे.,बाहेर जाताना मास्क आठवणीने घ्यावे.,पावसाचे दिवस असल्याने एक जादाचा मास्क सोबत ठेवावा ..ओला मास्क अजिबात वापरू नये.,सतत सोबत सॅनीटायझर ठेवावे व कोणत्याही वस्तूला हात लावण्याआधी व लावल्या नंतर लगेच वापरावे.आपण बाहेर गेल्यावर आपल्या घराप्रमाणे आपण या समाजाचे काही देणं लागतो हे लक्षात ठेऊन वावर करावा कारण प्रत्येकावर काहींना काही जबाबदारी असते आणि त्यासाठीच प्रत्येकाची कोण ना कोण तरी वाट पाहत असते.
पहिले आपण म्हणायचो मीच माझा रक्षक आता आपण सर्व म्हणूया माझा समाज माझी जवाबदारी मी सुरक्षित राहणार आणि इतरांना देखील सुरक्षित ठेवणार