महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाची मालिका निर्माण करून क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी घडलेली घटना म्हणजे सत्तेवर आलेले महाविकास आघाडी सरकार..!
आज (ता २८) बरोबर सहा महिन्यांपूर्वी हे सरकार अनपेक्षितरित्या सत्तेवर आलं. भारताच्या राजकीय इतिहासात आजपर्यंत कधीच एखादया राज्यात सत्ता स्थापन होताना इतक्या खेळया,कुरघोड्या, डाव, प्रतिडाव, रातोरात उठलेली राष्ट्रपती राजवट, पहाटे झालेला शपथविधी आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू झालेली लढाई,असा दमछाक करणारा कुटाणा झाला नव्हता तो महाराष्ट्रात घडला.या घटना आठवल्या तरी आजही अंगावर काटा उभा राहतो.
‘मोदी है तो सब मुमकीन है…अशी देशाला सवय लागलेली असताना महाराष्ट्राच्या रूपाने प्रथमच भाजपचा मुखभंग झाला. २०१९ मध्ये देशात दुस-यांदा सत्तेवर आलेल्या मोदी राजवटीमुळे अवसान गळालेल्या देशातील तमाम विरोधी पक्षांना आशेचा किरण दाखवणारे,बळ देणारे, व हिंमत देण्याचे काम महाविकास आघाडीच्या निर्मितीमुळे शक्य झाले.
या प्रयोगाच्या निर्मितीचे शिल्पकार होते अर्थातच शरद पवार…! कसे बनले हे सरकार ? काय घडले त्या ३६ दिवसात ?अजित पवारांनी का केले बंड ? काँग्रेसने का घेतला सत्तेत सहभाग ? यासाठी वाचा ,पत्रकार विजय जगताप यांचे “ महाविकास आघाडीच्या जन्माची कहाणी” हे लाॅकडाऊन संपल्यांनंतर प्रकाशित होणारे पुस्तक…!