( विजय जगताप)
राज्यात कोरोनाचा कहर थांबण्याची चिन्हे दिसत नसताना आधीच तणावात असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर आजपासून( मंगळवार) भाजपने अटॅक करण्यास सुरूवात केली. कोरोना रोखण्यात महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने जाणिवपूर्वक सरकार स्थिर झाल्याची संधी शोधली.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मागील महिन्यात राज्यपाल नियुक्त आमदार करण्याच्या मार्गात भाजपने उच्च न्यायालयात जाऊन खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता.तसेच राज्यपालांकडूनही याविषयी निर्णय घेण्यात विलंब लावला होता.या पार्श्वभूमीवर २८ मे पर्यंत जर उध्दव ठाकरे आमदार झाले नसते तर मंत्रीमंडळाला राजीनामा दयावा लागला असता व त्याचे खापर भाजपवर फुटून संकटकाळात भाजप कसा संधी शोधतो या लोकभावनेत झाली असती.
त्यामुळे केंद्राला कळवून विधानपरिषद निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाला घ्यायला लावत भाजपने प्रथम ठाकरे यांचा आमदारकीचा प्रश्न काल सोडविला.आणि मग आजपासून सरकारला घेरण्याचा पवित्रा उचलला.
आज सकाळी साडेअकरा वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेऊन हे सरकार कोरोना थोपवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला.एवढेच नाही तर राज्यातील सर्व जिल्हा व शहर अध्यक्षांना आपापल्या भागातील तहसिलदारांना सरकारच्या अपयशाबद्दल व गोरगरीबांसाठी पॅकेज जाहीर करण्याच्या मागणीबद्दल निवेदन द्यायला लावले.भाजपने आता हाती घेतलेल्या या स्टॅन्डला ‘ महाराष्ट्र बचाओ आंदोलन’असे नाव दिले असून शुक्रवारी राज्यातील भाजप कार्यकर्ते घराबाहेर पडून आंदोलन करणार आहेत.बॅक घोटाळ्यातील आरोपी वाधवान परिवारास लाॅकडाऊन काळात खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्याचे पत्र दिलेले गृहखात्याचे अधिकारी अमिताभ गुप्ता यांचीही सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी कालच श्री फडणवीस यांनी करून सरकारच्या नाकाबंदीस सुरूवात केली आहे.