(श्रीकांत चौगुले)
कोरोनामुळे संचारबंदी लागू असल्याने सगळेचजण आपापल्या घरात आहेत.सक्तीने घरी राहिल्याने वेळेची उपलब्धता, कोरोनाची भिती व जागरूकता तसेच मनोरंजनासाठी अधिक वेळ टिव्हीच समोर असल्याने सर्वच मराठी न्यूज चॅनेल पाहण्यास लोक प्राधान्य देत आहेत.
हिंदी असो की मराठी या सा-या न्यूज चॅनेलमध्ये बातम्यांचा केंद्रबिंदू फक्त आणि फक्त करोनाच आहे. प्रत्येक बातमीत कोरोनाच असल्याने लोकांमध्ये भिती बरोबरच जागरूकता देखील आहे. एरव्ही बातम्यांच्या चॅनेलपासून दूर असलेला महिला वर्ग देखील या बातम्या आवर्जून पाहत असल्याचे चित्र आहे.न्यूज चॅनेलच्या चर्चासत्रांमध्येही ( डिबेट) राजकीय विषय सोडून आरोग्य विषयक मुलाखती व चर्चा असल्याने लोकांच्या ती पसंतीस पडत आहे.
सक्तीने घरी राहिल्याने लोकांकडे वेळही भरपूर आहे.
न्यूज चॅनेलबरोबरच तारक मेहता का उल्टा चष्मा ( सब टिव्ही) कपिल शर्मा शो ( सोनी ) यांचे मागील भागांचे दळण चोवीस तास सुरू असल्याने हे देखील लोकांच्या पसंतीस पडत आहे.चित्रपटांना वाहिलेले चॅनेलही लोकांना आवडत आहेत. कोण कोणाच्या घरी जात येत नसल्याने टिव्हीने कुटूंबातील सर्वांच्या ह्दयात जागा केली आहे.