राष्ट्रीय स्तरापर्यंत आयोजन केलेले असलेल्या बेरोजगारीवर आधारित ‘यंग इंडिया के बोल’ या वक्तृत्व स्पर्धेचे पिंपरी चिचंवड शहर स्तरावरील आयोजन आज करण्यात आले पिंपरी येथील एका हॉटेलच्या हॉल मध्ये या स्पर्धा सकाळी ११ पासून घेण्यात आल्या.
“बेरोजगारीची नोंदणी राष्ट्रीय स्तरावर करण्यात यावी म्हणजेच (NRU) यासाठी युवक काँग्रेस विविध प्राकारची आंदोलने करत आहे यापूर्वी देखील पोस्टर्स, सह्यांची मोहीम असे उपक्रम राबविले गेले आहेत आता वक्तृत्व स्पर्धे द्वारे युवक-युवतीचे या विषयावर विचारमंथन व्हावे यासाठी या स्पर्धा आयोजित केल्याचे व विजेत्यानां राज्यस्तरीय फेरी साठी पाठवण्यात येणार आहे” असे युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
युवकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन बेरोजगारीवर आपले मुद्दे मांडले, देशातील आर्थिक परिस्थिती हीच तरुणाची बेरोजगारी निर्माण होण्याचे कारण आह या विषयावर बहुतांश मते मांडून बेरोजगारी ची भीषण अवस्था कशी निर्माण झाली याबाबत भावना व्यक्त करण्यात आल्या.
प्रथम पारितोषिक मयूर नरूटे याला द्वितिय पारितोषिक सुमित पाग्रुट, तृतीय पारितोषिक क्रांती जाधव व उत्तेजनार्थ पारितोषिक सचिन भवार यांना मिळाले. यांना अनुक्रमे रोख बक्षीस रू.३०००, २०००, १००० व ५०० तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पारितोषिक वितरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, परीक्षक म्हणून प्रा.संजय पवार यांनी जबाबदारी पार पाडली.
याप्रसंगी पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, जिल्हा सरचिटणीस राहूल काळभोर, युनुस बागवान, आदि पदाधिकारी उपस्थित होते.