(विजय जगताप)
‘मणीपूर राज्यात शिवसेना नऊ जागांवर लढत असून तीन ते चार जागांवर आम्ही विजयी होऊ’ असा विश्वास मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी ‘बातमी खास’शी व्यक्त केला.
मणिपूरहून आज ते थेट ‘बातमी खास’शी बोलत होते. ‘मागील तीन दिवसांपासून आपण या राज्यात तळ ठोकला असून सेना प्रथमच या राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे. माझ्यासह खासदार राहुल शेवाळे, अरविंद सावंत तसेच चंद्रकांत खैरे आदी नेते मंडळींचा ताफा मणीपूर राज्य ढवळून काढत आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी व त्यांच्या विचारकार्याबद्दल मणीपूरवासियांना प्रचंड आकर्षण असून आमच्या सभांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
काल (मंगळवारी) तीन वाजता एका प्रचारसभेत असतानाच मला चेन्नईवरून सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी कळाली. आमचे मणीपूर शिवसेना राज्य प्रमुख एम. टोब्बीसिंग यांनी लगेचच ही वार्ता सर्वत्र जाहीर केल्यानंतर पेढे वाटप व आनंदोत्सव तिथेच साजरा करण्यात आला.