कोरोनामुळे संपूर्ण देश लाॅकडाऊन असताना नेमके आंबेडकरी समाजाचा श्वास असलेल्या १४ एप्रिललाच सार्वजनिक जयंती करता येणार नसल्याने एका कुटूंबाने अखेर आपल्या शेतातच महामानवाला अभिवादन केले.
सोलापूर जिल्ह्यातील सलगर खुर्द( तालुका मंगळवेढा) या खेडयातील व्हनवटे कुटूंबाने जयंती साजरी करण्यासाठी सकाळपासूनच तयारीला सुरूवात केली.रानातच घर असलेल्या या कुटूंबातील नागेश व्हनवटे या तरूणाने आपल्या शेतातच छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या प्रतिमा ठेऊन कुटुंबासह अभिवादन केले. त्यानंतर घरी बनविलेले खीर ,पुरीचे गोड जेवण गावातील तीन गरीब कुटुंबाला त्यांनी अन्नदान केले.