सध्याच्या राज्यकर्त्यांकडून संविधानाला असलेला धोका वेळीच ओळखुन नव्या पिढीने मतदान या आपल्या हातात असलेल्या मुलभूत अधिकाराची जाणीव ठेवून परिवर्तन घडवावे , असे प्रतिपादन प्रा. डाॅ प्रवीण रणसुरे यांनी आज येथे केले.
भारतीय संविधानाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त घरकुल, चिखली येथील संविधान चौकात आयोजित “ संविधान व अर्थव्यवस्था” या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
प्रा. किरण खुजेकर, पत्रकार विजय जगताप यावेळी विचारपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते.
डाॅ रणसुरे पुढे म्हणाले, ३७० कलम हटविल्याची जी प्रौढी मिरविली जात आहे वास्तविक ती मूळ बाबासाहेबांची भूमिका होती. व आजही बाबासाहेबांच्या मार्गदर्शक सुचनांचा आधार घेतल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही हे वास्तव आहे. ज्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन स्थितीत विरोध करण्यात आला होता आज त्याची अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नसल्याची स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी संविधान दिन सोहळा समिती, घरकुल चिखली प्राधिकरण येथील सर्वांनी पुढाकार घेतला.