मराठा सेवा संघाची कार्यबीजे रोवण्यामध्ये छत्रपती शिवाजी व राजर्षी शाहू महाराज यांचे आदर्श पाठीशी असल्याने या संघटनेचा जगभरात विस्तार होऊ शकला, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते व मराठा सेवा संघाचे प्रवक्ते गंगाधर बनवरे यांनी आज येथे केले.
पिंपरी येथील संत तुकारामनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य रामकिशन पवार होते. संयोजक व मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, माजी महापौर योगेश बहल, सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजू दुबल, उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, माजी नगरसेवक शाम लांडे, सुलक्षणा शिलवंत-धर, जितेंद्र ननावरे, सामाजिक कार्यकर्ते वर्षा जगताप, यावेळी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचडचे संस्थापक सदस्य व पिंपरी महापालिकेचे निवृत्त सहआयुक्त अमृतराव सावंत यांचा जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी अनिल कातळे, प्रकाश गायकर (पत्रकारिता), विनायक पाटील, मोहन पवार (वैद्यकीय) देवेंद्र बाबर (उद्योजक) किशोर ढोकळे (कामगार नेता), संजय दातीर (वकिली) यांना मराठा भूषण तर सामाजिक कार्यकर्ते, व लेखक विजय जगताप यांचा ‘मराठा मित्र पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
तसेच कार्यकर्ता सन्मान पुरस्कार म्हणून विविध धर्मीय मंडळींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सुभाष देसाई, विजय शिंदे, जयसिंग सासवडे, सुरेश इंगळे, मोहन जगताप, श्रीमती सुलभा यादव, विजय गायकवाड, सुहास कोळी, दादाभाऊ आल्हाट, सुरेखा कामठे यांना गौरविण्यात आले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य रामकिशन पवार यांनी, उपेक्षित घटक म्हणून आता मराठा कुटुंबियांची संख्या समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के इतकी असून मराठा आरक्षण का आवश्यक आहे? याची विस्तृत माहिती त्यांनी दिली. यावेळी योगेश बहल, प्रकाश जाधव, राजू दुबल यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. लक्ष्ण रानवडे यांनी केले तर गोविंद खामकर यांनी आभार मानले. श्रीकांत चौगुले यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या संयोजनासाठी वाल्मिक माने, सचिन दाभाडे, प्रविण कदम, अशोक सिसोदे, अशोक सातपुते, प्रकाश बाबर, ॲड. सुनील रानवडे, सुनिता शिंदे, माणिक शिंदे यांनी पुढाकार घेतला.