(विजय जगताप)
पिंपरी चिंचवडकरांना भूषणावह वाटेल असे स्थान थेरगाव येथे राहणाऱ्या पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी देशात मिळविले असून त्यांचा उचित सन्मान व त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेतली आहे.
आज संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असला तरी ” हर घर तिरंगा” हा उपक्रम आणि जगभरातील ५५ हजार ठिकाणी होत असलेले सरकारी कार्यक्रम यांची रचना व कॄती आराखडा तयार करण्यामध्ये पिंपरी चिंचवडचे योगदान श्री पेटकर यांच्या रूपाने देशाला लाभले आहे.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १४० जणांची समिती स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवासाठी नेमण्यात आली असून त्यामध्ये पिंपरी चिंचवडचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त मुरलीकांत पेटकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या या समितीच्या बैठकीत श्री पेटकर यांनी मांडलेल्या सुचनांचा स्विकार करण्यात आला.
भारताला स्विमिंग मधील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवण्याचा विक्रम श्री पेटकर यांच्या नावावर आहे.
भारत पाकिस्तान युद्धात अतुलनीय कामगिरी बजावली असल्याने त्यांना पद्मश्रीने गौरविण्यात आलेले आहे.
विशेष म्हणजे नुकतेच उद्घाटन झालेल्या दिल्लीतील भारतीय पंतप्रधान म्युझियममध्ये १९७२ मधील युध्दात त्यांनी केलेल्या कामगिरीचे दालन प्रतिकृती स्वरुपात कायमस्वरूपी मांडले आहे.