सर्वोच्च न्यायालयाने जरी मराठा आरक्षणाविरोधात निकाल दिला असला तरी यासाठी तीन पर्याय केंद्राकडे असून हा प्रश्न सुटू शकतो असे मत ज्येष्ठ विधीज्ञ व मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष ॲड लक्ष्मण रानवडे यांनी आज व्यक्त केले.
मराठा समाजाला आरक्षण दयायचे असेल तर या समाजाला महाराष्ट्राच्या ५२ टक्के आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यावे लागेल किंवा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे . तर तिसरा पर्याय म्हणजे आरक्षणाची ५० टक्के मर्यादा उठवून मराठा समाजाला मिळालेले १२ टक्के आरक्षण मोदी सरकारने द्यावे , असे ॲड रानवडे यांनी म्हटले.आरक्षण प्रकरणी मराठा समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे ताकदीनिशी मागणी करावी लागेल , तरच हे कठीण कार्य सुलभ होऊ शकेल , असेही मत त्यांनी नोंदविले.
‘मराठा समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण रद्द करून सुप्रीम कोर्टाने जबरदस्त धक्का दिला आहे . वास्तविक पाहता मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टाने स्थगिती न देता खंडपीठाकडे वर्ग केलं असते तर खंड पीठाची निर्मिती होऊन सुनावणीसाठी १० ते १५ वर्ष गेली असती व मराठा समाजाला हायकोर्टाने दिलेल्या आरक्षणाच्या फायदा झाला असता व काही काळासाठी हा प्रश्न मिटला असता .
पन्नास टक्कयांपेक्षा अधिक आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक स्थिती असलेली लागते , म्हणजेच आरक्षणाची मागणी करणारा समाज अत्यंत दुर्लक्षित , सर्व समाजापासून तुटलेला दुर्लक्षित समाज असावा अशी धारणा सुप्रीम कोर्टाची आहे .
त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ४३ टक्के संख्येने असलेला मराठा समाज हा दुर्लक्षित अथवा समाजापासून कसा दूर असू शकेल ? एक वेळेस सधन असलेला हा समाज आज अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. मराठा समाजातील काही टक्के समाज सोडल्यास आर्थिक , सामाजिक व शैक्षणिकरित्या मागास आहे. म्हणून मराठा आरक्षण मिळणे आवश्यक आहे , असे मत रानवडे यांनी व्यक्त केले .
मराठा समाजाला आरक्षण द्याचे असेल तर या निकालाविरुद्ध रिव्ह्यू अँप्लिकेशन करून पुन्हा दाद मागावी लागेल असेही रानवडे म्हणाले , पण यात किती यश मिळेल हि शंकाच असल्याचे त्यांनी नमूद केले .
मराठा समाजाला आरक्षण द्याचे असेल तर, त्याला महाराष्ट्राच्या ५२ टक्के आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यावे लागेल वास्तविक पाहता महान विचारवंत व दूर दृष्टी असलेले परम पूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आरक्षणाची १० वर्ष मुदत दिलेली असताना भाजप सहित सर्व सरकारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवत गेले त्यात वाईट काही नाही पण या मधल्या काळा मध्ये मराठा समाज ची परिस्थिती अत्यंत वाईट झाली . आता मोदी सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे ,असे रानवडे म्हणाले