राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री डाॅ नितीन राऊत यांनी आज महाराष्ट्र दिनी आंबेडकरी विचारधारेचे प्रतीक समजली जाणारी निळी टोपी घालून ध्वजारोहण केले.
नागपूरच्या विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या या शासकीय कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मिडियात झळकू लागल्यानंतर डाॅ राऊत यांच्या या निर्णयाचे व भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले.
“कणखर देशा ,दणकट देशा ,महाराष्ट्र देशा”अशी ओळख महाराष्ट्राची सांगितली जाते.
डॉ.नितिन राऊत साहेब हे आंबेडकरी चळवळीतील दमदार नेते आहेत.१५ ऑगस्ट,२६जानेवारी अथवा महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय झेंडावंदन करताना डोक्यावर टोपी असणे अनिवार्य आहे. राऊत साहेब हे बौद्ध समाजातील अग्रगण्य पुढारी असून ते नेहमी झेंडा वंदन करताना डोक्यावर निळी टोपी घालून तिरंग्याला सलामी देतात.
दरम्यान,संघ भूमीत दीक्षाभूमीच्या वाघाने निळीटोपी घालून ध्वजारोहण ही अभिमानाची बाब समजली जात असल्याची भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे यांनी व्यक्त केली.